Wednesday, August 28, 2013

शरदमियाँ सुभानअल्ला !

शरदमियाँ सुभानअल्ला !





वय वाढले की भय वाढते. मात्र काही लोक जसजशी वयाने वाढतात तसतशी बिनधास्त होत जातात. त्यांना फ़क्त आपला स्वार्थ दिसत असतो. शरदमियाँनी आता ऐन नागपंचमीच्या मुहुर्तावर आपण किती भयमुक्त आहोत हे दाखवून दिले आहे. हिंजवडी येथे झालेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या  त्रैमासिक अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, " अन्याय झालेल्या मुस्लिम तरुणांनी बदला घेतला तर त्यांचा काय दोष?"
पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे अजित पवारांचा 'प्रभाव' त्यांच्यावर पडलाय असे कोणी समजू नये.  त्यांच्या प्रत्येक कृतिमागे राजकारण असते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीने पवारांनी हे व्यक्तव्य केले आहे. त्याचे काय आणि किती गंभीर परिणाम पडतील याची त्यांना कल्पना नाही, असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी हे व्यक्तव्य केले; कारण हिंदुना विकत घेणे सहजशक्य  आहे, हे त्यांना पुरते ठावूक आहे. अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी मात्र अधूनमधून असे बोलावे लागते. हिंदूंकड़े ना कसला स्वाभिमान, ना कसला विवेक. त्यांना काहीही बोला फरक पडत नाही. सारेच निऱढावलेले! त्यामुळे  मुस्लिमांचे लांगुलचालन महत्वाचे!
पाकधार्जिण्या वृत्तीच्या शरदमियाँनी सांगितले की, "शुक्रवारी मुस्लिम समाजातील मुले मस्जिदीत स्फोट घडवतील असे मला वाटत नाही. ते इतर कोठेही स्फोट करतील मात्र मस्जिदीत करणार नाहीत. मालेगावातील स्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांचा यात हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांविषयीची आपली मते बदलली पाहिजेत. या प्रकरणातील मुस्लिम समाजातील १९ मुले ३ वर्षे तुरुंगात पडली होती, त्यांच्या आयुष्याचे काय? या देशाकडे त्यांनी काय म्हणून बघायचे? मग त्यातल्याच एखाद्याच्या डोक्यात राग शिरून त्याने बदला घेतला तर त्याला दोष कसा देणार?"
पवार ज्येष्ठ नेते आहेत. आमच्यासारख्या पामराने त्यांना काय सांगावे? मात्र विशिष्ठ दिवशी, विशिष्ठ जातीतील, धर्मातील लोक देशद्रोही, समाजद्रोही कृत्य करणार नाहीत, असे गृहीत धरण्यामागचे तत्त्वज्ञान काही आम्हांस कळत नाही.  न्यायालयात भगवतगीतेवर हात ठेवून धडधडित खोटे बोलणा-या व्यक्तिंनाही  यापुढे निरपराध ठरवले पाहिजे; कारण 'आपल्या धर्मग्रंथावर हात ठेवून कोण कशाला खोटे बोलेल?' असेही उद्या नरेन्द्र मोदींसारख्या कुण्या नेत्याला वाटणे शक्य आहे.
विधीमंडळात जलसिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांवर होणारी चर्चा थांबवण्यासाठी त्यांनी ते प्रकरण 'न्यायप्रविष्ठ' असल्याचे सांगितले. मग मालेगांव स्फोटाचे प्रकरणही  'न्यायप्रविष्ठ' असताना पवारांनी फुत्कार सोडण्याचे कारण नव्हते. तपास यंत्रणांच्या माध्यमातून आज ना उद्या त्यातील सत्य बाहेर आलेच असते. मग अशापद्धतीने गंभीर विधान करून त्यांना पोलिसांना काही संदेश तर द्यायचा नाही ना? 'मते नाही मिळाली तरी चालेल' असे सांगणारे पवार मतांसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे.
या व  अशा प्रकरणांतील सत्य जनतेसमोर यावे. यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. मात्र आयुष्यभर 'जातीय तेढ निर्माण करू नका' असे सांगणा-या पवारांनी दोन समाजात फूट पाढण्याची भाषा करून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ज्या गोष्ठी पवार पडद्याआड, खाजगीत करतात, असा अनेकांचा ठाम समज आहे ते पवारांनी जाहीरपणे करण्याचे  धाडस दाखवले आहे. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला मूठमाती देत त्यांनी एकप्रकारे सुडाने  पेटून उठलेल्यांचे बळ वाढवण्याचा उद्योग केला आहे. 'त्यांनी बदला घेतल्यास दोष कुणाचा?' असा सवाल उपस्थित करून त्यांनी मुस्लिम समाजाचा रोष वाढवला आहे. अनेक देशभक्त मुस्लिमांनीही पवारांच्या या विधानाचा निषेधच केला आहे.
जे मनाने कमकुवत आहेत, जे आक्रमक वृत्तीचे आहेत, ज्यांच्या मनात हिंदुस्तानविषयी द्वेष आहे , जे खरोखरीच सुडाच्या भावनेने पेटलेले आहेत, जे चुकीच्या धार्मिक संकल्पनांना बळी पडले आहेत, ज्यांनी हिंदुना संपवण्याचा विडाच उचलला आहे त्यांचा उत्साह पवारांनी वाढवला आहे. ते आज पवारांना धन्यवाद देताना फक्र महसूस करत आहेत.
मालेगाव स्फोट प्रकरणातील पोलिसांनी त्याबत घेतलेली १९ मुस्लिम मुले खरेच निरपराध आहेत, असे आपण गृहीत धरु.  त्यांनी सूड उगवला तर त्यांना दोष देता येणार नाही, असे नामदार पवारांना वाटते. मग शरदमियाँनी लोकांना हेही स्पष्टपणे सांगावे की, इथल्या व्यवस्थेचे बळी ठरलेल्या असंख्य लोकांनी सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना, नेत्यांना किमान जोड्याने हाणावे का? सुडाच्या भावनेने स्फोट घडवणे, कुणाचा खून करणे हे सहिष्णू बांधवांना मान्य नाही. मात्र किमान या हरामखोरांचे  कपडे फाडून, त्यांना काळे फासून, मुळामुठेचे 'तीर्थ' पाजून त्यांची गाढवावरून धिंड काढली तर पवारांना चालेल का? तीन वर्षेच नाही तर आख्खे आयुष्य उध्वस्त झालेल्या अनेकांची या व्यवस्थेवर सूड उगवण्याची तीव्र इच्छा आहे. नामदार पवारांनी त्यास अनुमोदन दिले तर 'चपराक'च्या वतीने आम्ही अशा असंख्य तरुणांचे प्रतिनिधित्व करू! मुळातच भडकलेल्या माथ्यांना शांत करण्यासाठी अनेकांना बांबूने सटकवण्याची आमची तीव्र इच्छा पवारांच्या या 'उदारमतवादी' धोरणांमुळे  पूर्ण होऊ शकते.
विदर्भातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दलालशाही, सरकारी धोरणे, लाचलुचपत यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. त्यांच्या कुटुंबीयांना आजही वाटते हे कसले स्वातंत्र्य? आजही त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा द्यावा वाटतो. आपल्या कुटुंबाची वाताहत करणा-या अनेक प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांना सुळावर चढवावे अशी त्यांची भावना आहे. पवारांच्या 'नव्या धोरणां'नुसार त्यांना एवढी 'संधी' तरी मिळायलाच हवी ना! तिकडे आर. आर. पाटील म्हणताहेत, 'पोलिसांना पगार परवडत नसल्याने त्यांना लाच घ्यावी लागते. इकडे थोरले पवार विचारताहेत 'मुसलमानांनी बदला घेतला तर त्यांचा काय दोष?' या सगळ्या राजकीय स्वार्थगिरित दोष फक्त सामान्य माणसाचा आहे जो यांना खपवून घेतो.
जात, धर्म याचे आज कुणालाही फारसे काही वाटत नाही. मात्र राजकारणी त्याला खतपाणी घालतात. लोकांत फुट पाडतात. स्वत:ला 'जाणता राजा' म्हणवून घेणा-यानेही असे उद्योग करणे हे खरोखरी लाजीरवाणे आहे. अशावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या जागृत ज्वालामुखीची आठवण आल्यावाचून राहत नाही. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्र पोरका कसा झाला, हे पाहण्यासाठी पवारांचे हे विधान ध्यानात घ्यावे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी यांची चांगलीच फाडली असती.
जनतेला आता सुडच घ्यायचा असेल तर अशा पृव्रत्तिचा घ्यावा. राजकारणाला बळी पडून आपापसात भांडत राहणे, सुडाची भाषा करणे हे शर्मनाक आहे. समाजच मुर्दाड झाल्याने काही गिधाडं घिरट्या घालतात. मात्र त्यांना जुमानण्याची आवश्यकता नाही. समाजात शांती प्रस्थापित होईल आणि सर्वजण गुण्यागोंविंदाने राहतील यासाठी सामान्य माणसांनी आता जाणीवपूर्वक कार्यरत राहणे गरजेचे आहे. कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता बंधुभाव टिकवणे, वाढवणे हीच काळाची खरी गरज आहे.
(संपादकीय लेख - साप्ताहिक 'चपराक - १२ ते १८ ऑगस्ट २०१३ )